समकालीन वास्तवावर थेट आणि मुद्देसूदपणे चर्चा करणारे हे वैचारिक लेखन आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी विविध विषयांवर केलेले हे भाष्य आहे. खरे तर प्रत्येक लेखात त्यांनी संबंधित घटनेची चिरफाड करून त्यामागे सत्य वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. भुकंपासारखी नैसर्गिक आपत्ती, धर्माबद्दल बुद्धीभेद, मालेगाव बॉम्बस्फोट, भारतमाता की जय, मनोधैर्याचे खच्चीकरण, अस्थैर्य अशा विषयांवर हे लेख आहेत.
‘पूर्वीच्या काँग्रेसींनी या सवय आणि पुरोग्रामी म्हणविणाऱ्या बांडगुळांना लायकीपेक्षा अधिक जागा देऊन डोक्यावर बसवून ठेवले’, ‘काळा पैसा आणि कोणत्याही कामासाठी मागितली जाणारी लाच या गोष्टी गृहीत धरल्यासारख्या आपण मान्य केल्या आहेत’, ‘रोहिंग्या मुस्लिम घुसखोर सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाहीत’ या वाक्यांवरून विषयांचे गांभीर्य समजू शकते.
प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १६८
किंमत : १८० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)